भारतातील नामांकित व 86 वर्षांची परंपरा असलेल्या नवभारत तथा नवराष्ट्र वृत्तसमूहाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा "Emerging Multistate of the Maharashtra ” हा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सहकारातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
व्यंकटेश परिवारातील 2 लाख सभासदांचा हा पुरस्कार असुन सर्व सभासदांच्या वतीने पुरस्कार स्विकारताना संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे...
"चला जग जिंकूया" या व्यंकटेश मल्टीस्टेट परिवारातील सर्व सहकारी बांधवांसाठी चर्चा सत्र आयोजित केले होते. प्रमुख मान्यवर म्हणून साई आदर्श मल्टीस्टेट व पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. शिवाजीराव कपाळे, श्री. विनयजी पत्राळे (संस्थापक भारत-भारती), पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ. शांतीलाल सिंधी, महाराष्ट्र, प्रथितयश उदयोजक व समता पतसंस्थेचे संचालक श्री. संदीपजी कोयटे , छत्रपती मल्टीस्टेटचे संस्थापक श्री. संतोष भंडारी, प्रा. गणेश देशमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. अभिनाथ शिंदे, व्हा. चेअरमन श्री. व्यंकट देशमुख, संचालक मा.श्री. कृष्णा मसुरे, संचालक मा.श्री. अनिल गुंजाळ, मा.श्री.मंगेश देहेडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा.श्री. अंबादास पांडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), व्यंकटेश फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक ज्ञानेश झांबरे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राजेश भैय्या टोपे साहेब यांनी श्री व्यंकटेश मल्टीस्टेटच्या घनसावंगी शाखेस सदिच्छा भेट दिली.
घनसावंगी शाखेची रचना पाहुन खुप समाधान व्यक्त केले. संस्थेबद्दल माहिती विचारली, संस्थेने केवळ ८ वर्षात ३५० कोटीचा व्यवसाय केल्याबद्दल विशेष कौतुक केले, बँकिंग च्या येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी व व्यवसायाबाबत बाबत मार्गदर्शन करुण संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यंकटेश परिवाराकडुन मा.साहेबांचा सत्कार करण्यात आला.